मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसळ्यात शिक्षण व्यवस्थेचा विद्यार्थ्यांच्या भाविष्यासोबत खेळ...!     येत्या ३० दिवसांत अगर रिक्त पदे भरली गेली नाहीत. तर शाळांना टाळे लावून विद्यार्थ्यांसह पालक आणि ग्रामस्थांच्या मार्फत करणार उग्र स्वरूपाचे आंदोलन...सामाजिक कार्यकर्ता नवीद धनसे

म्हसळ्यात शिक्षण व्यवस्थेचा विद्यार्थ्यांच्या भाविष्यासोबत खेळ...! येत्या ३० दिवसांत अगर रिक्त पदे भरली गेली नाहीत. तर शाळांना टाळे लावून विद्यार्थ्यांसह पालक आणि ग्रामस्थांच्या मार्फत करणार उग्र स्वरूपाचे आंदोलन...सामाजिक कार्यकर्ता नवीद धनसे


विशेष प्रतिनिधी : आसिफ खान :

म्हसळा तालुका रायगड जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये गणला जाणारा तालुका असून म्हसळा सारख्या ठिकाणी अनेक खेडोपाड्यांतून जिल्हा परिषदेच्या शाळा या बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या दिसून येत आहेत. तर ज्या ठिकाणी शाळा सुरळीत सुरु आहेत अशा ठिकाणी पटसंख्या जास्त असून देखील शिक्षक मात्र कमी असलेले दिसून येत आहे. याबाबत स्थानिक व्यवस्थापन कमिटी आणि म्हसळा तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेसोबतच नागरिकांनी निवडून दिलेले राजकीय प्रतिनिधी देखील याबाबत सुन्न अवस्थेत असलेले दिसून येत आहे.म्हसळा श्रीवर्धन मतदार संघ नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात  महत्वाच्या स्थानी असून. या मतदार संघातून निवडून येणाऱ्या आमदारांना नेहमीच केबिनेट मध्ये स्थान मिळत असून देखील म्हसळा श्रीवर्धन तालुक्यात शिक्षण व्यवस्थेची हि  दुरावस्था असल्याचे चित्र दिसून येते.  तर काही सुत्रांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार केवळ म्हसळा च नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात शिक्षण व्यवस्थेबाबत हीच परिस्थिती असलेली दिसून येते.

        तर याबाबत म्हसळा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांची माहिती  घेतली असता शाळांमध्ये उपशिक्षक,पदवीधर,पदो.मुख्या. यांच्या एकूण पदांमधील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये जवळ जवळ  ४८.०६ टक्के  तर उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये ४८.०८ टक्के एवढी रिक्त पदे असून हि बाब म्हसळा तालुक्याच्या भवितव्यासाठी खूप मोठी चिंतेची बाब असल्याचे दिसून येते. तर रायगड जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्राबाबत अशीच उदासीनता राहिली तर रायगड जिल्ह्यात लवकरात लवकर अशिक्षित पिढी तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

                   तरी याबाबत पांगळोली येथील सामाजिक कार्यकर्ते नवीद धनसे यांनी दीपक केसरकर शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच श्रीवर्धन मतदार संघाचे आमदार तथा महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे व रायगड जिल्हाचे पालकमंत्री मा. उदय सामंत यांना लेखी निवेदन दिले असून येत्या ३० दिवसांत अगर रिक्त पदे भरली गेली नाहीत. तर शाळांना टाळे लावून विद्यार्थ्यांसह पालक आणि ग्रामस्थांच्या मार्फत उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असे आव्हान करण्यात आले आहे.

0 Response to "म्हसळ्यात शिक्षण व्यवस्थेचा विद्यार्थ्यांच्या भाविष्यासोबत खेळ...! येत्या ३० दिवसांत अगर रिक्त पदे भरली गेली नाहीत. तर शाळांना टाळे लावून विद्यार्थ्यांसह पालक आणि ग्रामस्थांच्या मार्फत करणार उग्र स्वरूपाचे आंदोलन...सामाजिक कार्यकर्ता नवीद धनसे"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...