
राज्यात सर्वत्र सध्या पळवापळवीचे राजकारण सुरु... कुणी पक्ष पळवत आहेत तर कुणी संस्था पळवत आहेत... आमदार जितेंद्र आव्हाड यांचे मुख्यमंत्री आणि उप-मुख्यमंत्री व पोलीस महासंचालक यांना ट्विटर द्वारे आवाहन..
रायगड जिल्ह्यातील बोर्ली पंचतन येथे रॉयल एज्युकेशन ट्रस्ट ही साधारण 1982 रोजी ए. आर उंडरे यांनी स्थापन केली होती. रॉयल एज्युकेशन सोसायटी ची स्थापना झाल्यापासून मोठ्या प्रमाणात शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असल्याने रॉयल एज्युकेशन सोसायटी च्या आज घडीला रायगड जिल्ह्यात साधारण १४-१५ शाळा सुरु असून या सोसायटीला शैक्षणिक क्षेत्रात मोठं मानाचं स्थान असलेलं पाहायला मिळते. अगदी ट्रस्टचा कारभार श्री. उंडरे आणि ट्रस्ट च्या कमिटीच्या देखरखी खाली ट्रस्ट च्या घटनेप्रमाणे व्यवस्थित सुरु असतानाच रॉयल एज्युकेशन सोसायटीची 2019 साली नवीन कमिटी स्थापन करून सोसायटीचे अध्यक्ष श्री. ए. आर. उंडरे यांची अध्यक्ष स्थानी नेमणूक करण्यात आली. मसुद हसन दर्जी, फारूक रहेमान, फारूक लोखंडे, हमीदा अब्दुर रहीम उंडरे, मोहसीन अब्दुर रहीम उंडरे, अफजल लादीवाला, अताऊल्ला रहेमान उंडरे व सय्यद इरफान रशीद यांची सोसायटीच्या ट्रस्टि म्हणून 2019 ते 2022 साला करिता नेमणूक करण्यात आली. तर श्री.ए. आर.उंडरे यांच 2020 रोजी निधन झाल्यानंतर सोसायटीच्या अध्यक्ष म्हणून त्यांच्या पत्नीची ट्रस्ट च्या अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली.याबाबत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली. तर 26-06-2022 रोजीनव्याने ट्रस्टिंची निवड करण्यात आली असता, 2022 ते 2025 या तीन वर्षांच्या कालावधीकरिता हमीद उंडरे, मसूद हसन दर्जी, मोहसीन अब्दुर रहीम उंडरे,अब्दुल कलाम उंडरे, शाबीर. ए. आर. उंडरे, शकिरा शफिक अहम्मद, आयेशा मोहसीन उंडरे, सुफियान शफिर उंडरे यांची निव्याने नियुक्ति करण्यात आली. यावेळी ए. आर. उंडरे हायस्कूल बोर्ली पंचतन येथे मुख्यध्यापक म्हणून कार्यरत असलेले अरिफ अन्सारी, आणि लेखापाल म्हणून कर्यरत असलेले मुबीन अराई हे त्यांच्या सोबत अब्दूल कादिर राऊत व इतर काही जण अचानक ऑफिस मध्ये आले. त्यांना ऑफिस मध्ये येण्याचं कारण विचारलं असता त्यांनी ट्रस्टीना ट्रस्ट आमची आहे तुम्ही सगळे येथून निघून जा. अस म्हणतं ऑफिस च्या बाजूला असणाऱ्या एका खोलीत मोहसीन अब्दुल रहीम उन्डरे आणि ट्रस्टच्या सदस्यांना बंद करून ठेवले.
आणि जोपर्यंत काही कागदपत्रावर सह्या करीत नाही तो पर्यंत तुम्हाला सोडणार नाही. असे म्हणून धमक्या द्यायला सुरुवात केली. दरम्यान ट्रस्टींमधील एका व्यक्तींनी पोलीस ठाण्यात कळविल्याने दिघी सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोमण यांनी आपल्या पथका निशी येऊन बंदी करण्यात आलेल्या लोकांची सुटका केली. तरी या नंतर जमलेल्या काहीजणांनी चुकीच्या पद्धतीने नवी ट्रस्ट ची कमिटी तयार केली याबाबत धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली असता. कार्यालयीन कागदपत्र हे त्या लोकांनी हिसकावून घेतल्याने पुरावे सदर करू शकले नाहीत तरी याबाबत दिनांक;- 30 में 2023रोजी मोहसीन अब्दुल रहीम उंडरे यांनी दिघी सागरी पोलीस ठाण्यात अरिफ अन्सारी, मुबीन अराई, दाऊद राऊत, मुत्सद्दीक परकार, अब्दुल कादिर राऊत, सय्यद इरफान नाजिरी, सादिक अली राऊत, निसार हसन दर्जी, फैसल मियाजन हुर्जूक, महम्मद अली परदेशी, अब्दुल मजीद जोम्बरकर, मन्सूर आदाम गिरे, अन्सार चोगले, कासीम खानजादे यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता १८६० कलम ३४,४२०,४६५,४६७,४७१,५०४,४६८,१२०-ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून देखील रायगड जिल्ह्यातील राजकीय व्यक्तींच्या हस्त क्षेपामुळे आजतगायत पोलीस प्रशासनकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे श्री. मोहसीन उंडरे यांनी आमच्या प्रतिनिधिजवळ बोलताना सांगितले तर याबाबत रायगड जिल्ह्यात काही सत्ताधारी राजकीय व्यक्तींच्या पुढे अधिकारी कायद्याला जुमानत नाहीत असे चित्र दिसून येते. तर महाराष्ट्रात पळवा पळवीच हे राजकारण थांबणार तरी कधी असा प्रश्न निर्माण होत आहे. आणि सोबतच अशा चुकीच्या लोकांना केवळ आपल्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून पाठीशी घालणाऱ्या राजकारण्यांमुळे सर्व सामान्यांना न्याय मिळेल का ? असा प्रश्न देखील मोहसीन उन्डरे यांनी आमच्या प्रतिनिधिजवळ बोलताना व्यक्त केला. तरी याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी महाराष्ट्र शासनाने न्याय मिळवून द्यावा यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री व पोलीस महा संचालक यांना ट्विटरद्वारे आवाहन केले असल्याचे समजते.
0 Response to "राज्यात सर्वत्र सध्या पळवापळवीचे राजकारण सुरु... कुणी पक्ष पळवत आहेत तर कुणी संस्था पळवत आहेत... आमदार जितेंद्र आव्हाड यांचे मुख्यमंत्री आणि उप-मुख्यमंत्री व पोलीस महासंचालक यांना ट्विटर द्वारे आवाहन.."
टिप्पणी पोस्ट करा