
मग उद्या राज ठाकरे यांनी त्यांच्याशी अनैतिक संबंध ठेऊ नये, संजय राऊत...
महाराष्ट्र : "उद्धव ठाकरे हे तेजस्विनी घोसाळकर यांना भेटतील. त्या पक्ष सोडतील असं वाटत नाही. सध्या पक्ष सोडणे ही फॅशन झालीय, की शिंग फुटलेत कळत नाही" असं संजय राऊत म्हणाले. "महाविकास आघाडी जिथे शक्य आहे, तिथे एकत्र लढेल. मविआची डिलिव्हरी नॉर्मल आहे. 27 मनपाच्या निवडणुका एकत्र लढवण्याच प्रयत्न आहे" असं संजय राऊत यांनी सांगितलं.
न्या. भूषण रामकृष्ण गवई यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या
सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. “चंद्रचूड सुद्धा होते
महाराष्ट्रातले. पण चंद्रचूड आणि भूषण गवई यांच्यात मोठा फरक आहे. चंद्रचूड
यांच्याविषयी आम्हाला अपेक्षा होत्या. त्यांनी न्याय केला नाही. भूषण गवई
यांच्याबद्दल अनेक वर्ष एकतोय. संघर्ष करुन ते सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले आहेत.
काल त्यांची मुलाखत ऐकली. मराठी माणूस म्हणून माझ मन भरुन आलं. त्यांनी सांगितलं.
मी इथे विकत जायला बसलेलो माही. निवृत्तीनंतर मी कुठलही पद स्वीकारणार नाही.
ज्याला अशा प्रकारचा मोह नाही, त्याला मोदीच काय? कुठलच सरकार विकत घेऊ शकत नाही. कुठलीही शस्त्रसंधी भूषण गवई
यांच्याकडून होणार नाही” असा विश्वास संजय राऊत
यांनी व्यक्त केला.
तीन पक्षांच सरकार असल्याने नॉर्मल डिलिव्हरी होत नाही. वेळ लागतोय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाल्याचा प्रश्न एका पत्रकाराने विचारला.
त्यावर “नॉर्मल डिलिव्हरी होत नाही. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना महिला
डॉ. सल्ला घ्यावा लागेल. अलीकडे भाजप सरकार डोनाल्ड ट्रम्प यांचं सल्ला घेतं, जे भारत-पाक युद्धात झालं. कारण त्यांचे जे दोन सहकारी आहेत, त्यांची नॉर्मल डिलीव्हरी कधीच झाली नाही, ते वाझंच आहेत” “त्यांची डिलीव्हरी होणार नाही. भाजपला
दुसऱ्यांची पोरं खेळविण्याची सवय आहे. दुसऱ्ंयाची पोरं पाळण्यात घेऊन माझी पोरं
सांगतात. त्यापासून लांब राहिलं पाहिजे” असं संजय राऊत म्हणाले.
‘राज ठाकरे हे एक मुक्त विद्यापीठ’
“राज ठाकरे हे एक मुक्त विद्यापीठ आहे.
तिथं जाऊन कोणाही पदवी घेऊ शकतो. राज ठाकरे यांनी एक प्रस्ताव माडंला उद्धव
ठाकरेंसमोर. आम्ही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला, देत राहू. फक्त आमची एकच अट आहे, ज्यांनी महाराष्ट्रासंदर्भात टोकाच्या भूमिका घेतल्या, त्यांच्याशी उद्या आपण एकत्र आल्यावर अनैतिक संबंध ठेऊ नये” असं संजय राऊत म्हणाले.
‘अजित पवार हे रेम्या डोक्याचे’
“राज ठाकरे आणि नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली, तेव्हा त्यांनी शिवसेना आमचा पक्ष आहे असं म्हटलं नाही” एकप्रकारे राऊत यांनी दोघांच कौतुक केलं. ‘अजित पवार हे रेम्या डोक्याचे आहेत’ अशी टीका राऊत यांनी केली.
0 Response to "मग उद्या राज ठाकरे यांनी त्यांच्याशी अनैतिक संबंध ठेऊ नये, संजय राऊत..."
टिप्पणी पोस्ट करा