
शिंदे यांच्या मंत्रिमंडळापेक्षा फडणवीस यांची टीम कशी वेगळी?, महायुतीने कशी साधली सर्व समीकरणं, पाहा...
महाराष्ट्र : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची संख्या आणि स्वरुप दोन्हीही भिन्न आहे. शिंदे यांच्या मंत्रिमंडळात एक मुख्यमंत्री तर दोन उपमुख्यमंत्री आणि एकूण २९ मंत्री सामील होते, तर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असले तर एकूण मंत्र्यांची संख्या तब्बल ४२ आहे. शिंदे यांच्या सरकारपेक्षा फडणवीस सरकारमध्ये १३ मंत्री जास्त आहेत.
अखेर बहुप्रतिक्षित महायुती सरकारचा
मंत्रिमंडळ विस्तार रविवारी झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये एकूण
३९ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. ज्यात ३३ जणांनी कॅबिनेटची तर ६ जणांनी
राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ आणि
फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाची टीम वेगळी आहे. सत्तेचा चेहराच नाही
तर मंत्रिमंडळाची संख्या आणि स्वरुप देखील बदलेले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी
आपल्या मंत्रिमंडळात सहकारी पक्षांना सामावून घेण्यासोबत जातीय समीकरण आणि
प्रादेशिक बॅलन्स देखील सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे..अनेक दिग्गजांना घरी
बसवून नव्या चेहऱ्यांना त्यांनी संधी दिली आहे.
मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यासह महायुतीच्या सरकारच्या
मंत्रिमंडळाची संख्या ४२ झाली आहे.महाराष्ट्रात कमाल ४३ मंत्री बनविता येतात, रविवारी ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. ज्यामुळे एका कॅबिनेट मंत्री
पदाची जागा रिक्त आहे. फडणवीस यांच्या सरकारात चार महिलांना संधी मंत्री बनण्याची
संधी मिळाली आहे. यात भाजपाच्या कोट्यातून तीन आणि एनसीपीच्या कोट्यातून एक अशा
चार महिला मंत्री झाल्या आहेत. शिंदे गटातून एकही महिला मंत्री झालेली नाही.
अजूनही खाते वाटप झालेले नाही. परंतू फडणवीस यांच्या टीमचा चेहरा स्पष्ट झाला आहे.
यातून हे स्पष्ट झाले आहे की युतीचा धर्म पाळत असताना अनुभवी आणि तरुण असे संमिश्र
संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे.
युती धर्मानुसार सत्तेची वाटणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
आपल्या मंत्रिमंडळात प्रत्येक घटक पक्षाच्या ताकदीनुसार त्यांना वाटा दिला आहे.
मंत्रिमंडळात भाजपाच्या कोट्यातून १९, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या
कोट्यातून ११ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून ९ मंत्र्यांचा
समावेश केलेला आहे. यात भाजपाच्या १६, शिवसेनेच्या ९ आणि एनसीपीच्या ८ कॅबिनेट
मंत्र्यांचा शपथविधी झालेला आहे. राज्यमंत्र्यांची यादी पाहीली तर भाजपाचे ३, शिवसेनेचे २ आणि एनसीपीच्या एकाने राज्यमंत्री शपथ घेतली आहे.
भाजपातून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री , शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि
राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची आधीच शपथ घेतली आहे. अशा
प्रकारे मंत्रिमंडळात २०, १२ आणि १० असे पक्षानुसार वाटणी झालेली
आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीत
भाजपाला सर्वाधिक १३२ जागांवर विजय मिळाला आहे. तर शिंदे यांच्या शिवसेनेला ५७, आणि अजित पवार यांच्या एनसीपीला ४१ जागांवर विजय मिळालेला
आहे.भाजपाने शिवसेनेच्या दुप्पट आणि एनसीपीच्या तिप्पट जागा जिंकल्या आहेत.
विधानसभेत जिंकलेल्या जागांच्या तुलनेत भाजपाने शिवसेना आणि एनसीपीला अधिक मंत्री
पदे देऊन युती धर्माचे केवळ पालन केले नसून सत्तेचे संतुलन देखील प्रस्थापित
करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
शिंदे यांच्या पेक्षा फडणवीस टीम वेगळी
कशी ?
महाराष्ट्रात साल २०२२ ते २०२४ एकनाथ
शिंदे यांच्या नेतृत्वाखालील चाललेल्या मंत्रीमंडळापेक्षा फडणवीस यांचे
मंत्रीमंडळाची टीम वेगळी आहे. कॅबिनेटची संख्या आणि स्वरुप दोन्ही पातळीत भिन्नता
आहे. साल २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या
३८ आमदारांनी भाजपासोबत सरकार स्थापन केले होते. त्यावेळी मंत्रीमंडळात बरोबरीचा
फॉर्म्युला ठरला होता. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनले होते आणि त्यांच्या
पक्षाचे नऊ आमदार मंत्री बनले होते. भाजपाच्यावतीने देवेंद्र फडणवीस उप
मुख्यमंत्री आणि ९ आमदार मंत्री बनले होते. त्यानंतर अजित पवार एनसीपीच्या ४०
आमदारांसह महायुतीत आल्याने त्यांनी उपमुखमंत्री पद तसेच त्यांच्या ८ आमदारांना
मंत्री बनविले होते.
शिंदे यांच्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री
आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसह एकूण २९ मंत्री सामील होते. आता फडणवीस यांच्या
कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांसह ४२ मंत्री आहेत. म्हणजे शिंदे यांच्या
कॅबिनेटपेक्षा देवेंद्र यांच्या कॅबिनेटमध्ये १३ मंत्री जास्त आहेत. तसेच शिंदे
यांच्या कॅबिनेटमध्ये दोन मुस्लीम मंत्री होते. तर फडणवीस यांच्या सरकारमध्ये केवळ
एक मुस्लीम मंत्री आहे. शिंदे यांच्या शिवसेनेतील अब्दुल सत्तार यांना यंदा संधी
दिलेली नाही.तर अजित पवार यांच्या कोट्यातील हसन मुश्रीफ मंत्री झाले आहेत.
शिंदे यांच्या अनेक मंत्र्यांना डच्चू
शिंदे यांच्या सरकारात मंत्री असलेल्या
अनेक दिग्गजांना फडणवीस यांच्या टीममध्ये जागा मिळालेली नाही. फडणवीस यांच्या
मंत्रिमंडळातील १० चेहऱ्यांना यंदा पहिल्यांदा मंत्री पदाची संधी मिळालेली आहे. तर
शिंदे सरकारमध्ये असलेल्या अनेक दिग्गजांचा फडणवीस यांच्या सरकारमध्ये पत्ता कट
झाला आहे. एनसीपीचे दिग्गज नेते आणि ओबीसी चेहरा असलेल्या छगन भुजबळ यांना
वगळण्यात आले आहे. दिलीप वळसे-पाटील यांची वर्णी लागली नाही. भाजपाचे सुधीन
मुनगंटीवार आणि शिवसेनेतील अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर यांना मंत्रिमंडळात
स्थान मिळालेले नाही.
या मंत्र्यांना नव्या सरकारमधून मिळाला
डच्चू
नाव |
पक्ष |
छगन भुजबळ |
राष्ट्रवादी काँग्रेस |
दिलीप वळसे पाटील |
राष्ट्रवादी काँग्रेस |
अनिल पाटील |
राष्ट्रवादी काँग्रेस |
संजय बनसोडे |
राष्ट्रवादी काँग्रेस |
सुधीर मुनगंटीवार |
भाजप |
विजयकुमार गावित |
भाजप |
रवींद्र चव्हाण |
भाजप |
सुरेश खाडे |
भाजप |
दीपक केसरकर |
शिवसेना |
अब्दुल सत्तार |
शिवसेना |
तानाजी सावंत |
शिवसेना |
छगन भुजबळ एनसीपीचे ज्येष्ट नेते असून
ओबीसीचे सर्वात मोठे नेते मानले जातात. सुधीर मुनगंटीवार भाजपाचे वरिष्ठ नेते असून
ते १९९५ मध्ये पहिल्या शिवसेना-भाजपा युतीच्या सरकारमध्ये, २०१४ च्या फडणवीस यांच्या सरकारमध्ये आणि २०२२ च्या शिंदे सरकारमध्ये
मंत्री राहीलेले होते. अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर एकनाथ शिंदे यांच्या जवळचे
मानले जातात. भाजपाच्या कोट्यातून मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण आणि विजय कुमार गावित
यांना देखील मंत्री बनवलेले नाही. शिंदे यांच्या शिवसेनेचे अब्दुल सत्तार, अर्जून खोतकर, तानाजी सावंत यांचाही पत्ता कट झाला
आहे.
असे साधले जातीय समीकरण
देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन
करताना जातीय आणि राजकीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाच्या कोट्यातली
१९ मंत्र्यांची यादी पाहीली तर त्यात ओबीसीपासून मराठा, दलित, आदिवासीच नव्हे तर ब्राह्मण आणि कायस्थ
यांना देखील संधी दिलेली आहे. तसेच ओबीसीचे सर्वाधिक ११ मंत्री बनविले आहेत. तर
मराठा सुमदायातील पाच जणांना मंत्री पदाची शपथ दिलेली आहे. याशिवाय एक राजपूत, एक दलित आणि एक आदिवासीला मंत्रिपद दिले आहे. सत्तेचे नेतृत्व जरी
ब्राह्मण मुख्यमंत्र्यांच्या हाती सोपवले असले तरी सर्वाधिक ओबीसी मंत्री केले
आहेत.
फडणवीस यांनी अशी साधली जातीय समीकरणं
नाव |
मतदार संघ |
जात |
चंद्रशेखर बावनकुळे |
कामठी - विदर्भ |
ओबीसी |
राधाकृष्ण विखे पाटील |
शिर्डी - प. महाराष्ट्र |
मराठा |
चंद्रकांत पाटील |
कोथरुड - पुणे - प. महाराष्ट्र |
मराठा |
गिरीश महाजन |
जामनेर- उत्तर महाराष्ट्र |
गुर्जर -ओबीसी |
गणेश नाईक |
नवी मुंबई- ठाणे |
ओबीसी |
मंगल प्रभात लोढा |
मलबार हील |
मारवाडी |
जयकुमार रावल |
धुळे- शहादा |
राजपूत |
पंकजा मुंडे |
बीड |
ओबीसी |
अतुल सावे |
औरंगाबाद- पूर्व |
ओबीसी - माळी |
अशोक उईके |
विदर्भ |
आदिवासी |
आशिष शेलार |
मुंबई - वांद्रे |
मराठा |
शिवेंद्रसिंह राजे भोसले |
सातारा प. |
मराठा |
जयकुमार गोरे |
सातारा पश्चिम महाराष्ट्र |
माळी- ओबीसी |
संजय सावकारे |
उत्तर महाराष्ट्र भुसावळ |
एससी |
नितेश राणे |
कोकण, कणकवली |
मराठा |
आकाश फुंडकर |
विदर्भ |
कुणबी मराठा, ओबीसी |
माधुरी पिसाळ |
पश्चिम महाराष्ट्र, पुणे
पर्वती |
ओबीसी |
पंकज भोयर |
विदर्भ - वर्धा |
कुणबी मराठा |
मेघना बोर्डीकर |
मराठवाडा - जिंतूर |
मराठा |
अजित पवार यांच्या कोट्यातून ज्यांना संधी दिली आहे.त्यातूनही त्यांनी त्यांची
व्होट बँक सांभाळली आहे. तीन ओबीसी समाजातील तर चार मराठा समाजातील नेते मंत्री
बनलेले आहेत. याशिवाय एक मुस्लीम आणि एक आदिवासी मंत्री बनविलेला आहे. अजित पवार
यांनी सर्वात जास्त मराठा समाजावर विश्वास दाखवला आहे. तर एकनाथ शिंदे यांनी चार
ओबीसी आणि चार मराठा समाजांच्या लोकप्रतिनिधींना मंत्री बनविले आहे. तसेच एक दलित
आणि एक ब्राह्मण मंत्री बनविला आहे.
फडणवीस यांचा प्रादेशिक समतोल
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जम्बो
मंत्रिमंडळाद्वारे महाराष्ट्रातील प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला आहे.
महाराष्ट्रातील सर्व सहा क्षेत्रांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नेत्यांना फडणवीस
यांनी संधी दिलेली आहे. भाजपातील कोट्यातून सर्वाधिक मंत्री विदर्भ आणि उत्तर
महाराष्ट्रातून झालेले आहेत. तर शिंदे यांनी मुंबई आणि कोकणातून जिंकलेल्या
आमदारांना खास महत्व दिलेले आहे. अजित पवार यांचे सर्वाधिक मंत्री पश्चिम
महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील आहेत. तर भाजपाने मुंबई आणि प.महाराष्ट्रातील
नेत्यांना खास संधी दिलेली आहे.
0 Response to "शिंदे यांच्या मंत्रिमंडळापेक्षा फडणवीस यांची टीम कशी वेगळी?, महायुतीने कशी साधली सर्व समीकरणं, पाहा... "
टिप्पणी पोस्ट करा