मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसल्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभागात काहीतरी काळभेर... माहिती देण्यासाठी विभागाकडून टाळाटाळ..!

म्हसल्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभागात काहीतरी काळभेर... माहिती देण्यासाठी विभागाकडून टाळाटाळ..!


म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. अझहर धनसे यांनी २२ डिसेम्बर २०२२ रोजी १) जल जीवन कार्यक्रम नळ पाणी पुरवठा अंतर्गत म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील सर्व कंत्राटदारांना देण्यात आलेल्या वर्क ऑर्डर ची प्रत मिळणेबाबत,२)कंत्राटदार सागर मोहिते यांना देण्यात आलेल्या सर्व कामांची सविस्तर माहिती,३)कंत्राटदार शुभम शिवाजी मोरे यांना देण्यात आलेल्या कामाची सविस्तर माहिती,४)कंत्राटदार श्री. दत्ता पवार यांना देण्यात आलेल्या कामाची सविस्तर माहिती. अशा प्रकारची माहिती मिळण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र ३० दिवस उलटून गेले तरीही एकही अर्जाची माहिती न मिळाल्याने दिनांक २५/१/२०२३ राजिप. ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग म्हसळा यांच्या कार्यालयात प्रथम अपिलीय अधिकारी तथा उप अभियंता ग्रा. पा. पु. राजिप. उप विभाग म्हसळा यांचेकडे अपील करण्यात आले असता, प्रथम अपिलीय अधिकारी यांनी दिनांक २०फेब्रुवारी २०२३ रोजी अझहर धनसे यांना याबाबत सुनावणी साठी बोलावले होते. मात्र एकाच व्यक्तीने केलेल्या अर्जाची सुनावणी करण्यासाठी दुपारी .१२.००,१.००,२.३० आणि सायंकाळी ४.०० वाजताच्या अशा वेगवेगळ्या वेळा देण्यात आल्या होत्या. तरी दुपारी २.३० मि. धनसे हे कार्यालयात हजर राहिले असता कार्यलयात प्रथम अपिलीय अधिकारी हजर नसल्याचे दिसून आले. तरी प्रथम अपिलीय अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलून प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात यावे अशी मागणी केली असता. बेकायदेशीर रित्या सुनावणी सुरु केली. तसेच मागितलेली माहिती अपूर्ण मिळत असल्याने याबाबत धनसे यांनी विरोध केला मात्र प्रशासकीय अधिकारी यांनी मनमर्जी कारभार करत सुनावणी सुरूच ठेवली. तरी यामध्ये ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला याबाबत माहिती न देण्या चे चित्र दिसून येते.
 माहिती न देण्याचं नेमक कारण काय? तर या विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची शंका नाकारता येत नाही.! तसेच प्रथम अपिलीय अधिकारी यांच्या ऐवजी इतर कोणत्याही व्यक्तीला सुनावणी घेण्याचे अधिकार दिले कुणी? असा प्रश्न निर्माण होत आहे. आणि प्रथम अपिलीय अधिकारी यांनी सुनावणीची तारीख दिली असताना कार्यालयात अनुपस्थित राहण्याच कारण काय? असे अनेक न सुटणारे प्रश्न निर्माण होत असल्याने काय खरंच पाणी पुरवठा विभागात भ्रष्टाचार होत आहे का? असा प्रशासनाच्या कारभारावर शंका उपस्थित करणारा प्रश्न निर्माण होत आहे. 


0 Response to "म्हसल्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभागात काहीतरी काळभेर... माहिती देण्यासाठी विभागाकडून टाळाटाळ..!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...