
आंबेत पुलाचा तोडगा सुटणार; संघर्ष समितीचे मुख्यमंत्र्यांकडे धाव!
म्हसळा प्रतिनिधी :-
रायगड रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत म्हाप्रल पुल गेली तीन वर्षे बंद अवस्तेथ आहे सदर पुलाचा काम लवकरात लवकर पूर्ण करून वाहतुकीस खुला करण्यात यावा तसेच नवीन पुलाची निर्मिती करण्यात यावी या करिता सोमवार १९ सप्टेंबर २०२२ रोजी मुंबई येथे सह्याद्री अतिथी गृहावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सावित्री नदी रायगड रत्नागिरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळा कडून निवेदन देण्यात आले. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष मुफ्ती खालिद सह पदाधिकारी फरीद उबारे,यशवंत गमरे,अजहर मुकादम,सज्जाद हसवारे शाहनवाज डावरे उपस्थित होते.
संघर्ष समितीचे अध्यक्ष मुफ्ती खालिद झटाम व पदाधिकारी यांनी महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या सोबत सदर पूल बंद असल्याने माणगाव, महाड, म्हसळा, दापोली, मंडणगड, खेड या तालुक्यातील जनतेची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. तसेच एस.टी.बस सेवेची दळणवळण व्यवस्था गेली तीन वर्ष बंद असून याचा जनतेच्या आर्थिक सामाजिक प्रगतीवर परिणाम झाला आहे, या सहा तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर मुंबई–पुणे कामानिमित्त ये-जाकरत असताना प्रामुख्याने याच पुलाचा वापर करत असतात त्यामुळे मोठा आर्थिक फटका येथील स्थानिकांसह सर्वच प्रवाशांना बसला आहे. शाळा, महाविध्याल्यातील विध्यार्थी, आरोग्य सेवा, पर्यटक वर्ग, स्थानिक शेतकरी, आठवडा बाजार व समाजातील सर्वच घटकांवर परिणाम झाला आहे. या सर्व बाबी मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या नंतर लवकरच आंबेत म्हाप्रळ पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी स्वता:हून लक्ष घालून कामाबाबत आदेश निर्गमित करून पुलाच्या थांबलेल्या कामाला गती मिळेल व प्रवाशी वर्गाची गैरसोय नक्कीच थांबेल असे आश्वासन या वेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिले.
मुख्य संपादक : अझहर धनसे कोंकण २४ न्युजउप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
0 Response to "आंबेत पुलाचा तोडगा सुटणार; संघर्ष समितीचे मुख्यमंत्र्यांकडे धाव!"
टिप्पणी पोस्ट करा