मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

महाड राजेवाडी येथे सरपंच आणि ग्रामपंचायत कमिटी ची दादागिरी !

महाड राजेवाडी येथे सरपंच आणि ग्रामपंचायत कमिटी ची दादागिरी !


महाड प्रतिनिधी ;- रायगड जिल्ह्यासह महराष्ट्रात स्थानिक स्वराज्य तसेच पंचायत राज योजनांच्या माध्यमातनू ग्रामपंचायतींची स्थापना करण्यात आली. ज्यामध्ये ग्रामीण भागाचा विकासास मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. याच पंचायत राज च कारभार चालवण्यासाठी गावातील सज्ञान नागरिकांनी म्हणजेच वय वर्ष १८ वर्ष पर्णू असलेल्या नागरिकांमधनू गावचा कारभार चालवण्यासाठी एक कमिटी नेमली जाते. सदर कमिटीची नेमणकू ग्रामपंचायत हद्दीतिल नागरिकांमधनू जाहीर सार्वत्रिक निवडनुकीच्या माध्यमातनू केली जाते. यातनूच पढुे गावच्या विकासात महत्वाचे निर्णय घेण्यासाठी सरपंच उपसरपंच यांची नेमणकू केली जाते. आणि या सगळ्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी एक प्रशासकीय अधिकार्याची{ग्रामसेवक} नेमणकू केली जाते.  तसेच वर्षातनू ठराविक वेळा गावातील मतदार तसेच ग्रामस्थ यांच्या साठी ग्रामसभा आयोजित केल्या जातात. ग्रामसभेसाठी किमान १०० किंवा एकूण मतदार

संखेच्या २% एवढी उपस्थिती आवश्यक असते. जर उपस्थिती कमी असेल तर कोरम अभावी सभा तहकूब करून ८ दिवसांनी सभा आयोजीत करण्यात येते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासुन अनेक ग्रामपंचायतीनमध्ये कोरम अभावी सभा तहकूब करून नतंर आपल्याच लोकांच्या मार्फत सभा घेऊन आपल्या मनासारखे निर्णय घ्यायचे असा एक नंविनच कार्यक्रर्यम जणू रायगड जिल्ह्यातील जवळ जवळ सर्वच ग्रामपंचायतींमध्ये सरुु असलेला दिसनू येत आहे. यामुळे गावच्या मुल समस्या सभेमध्ये येतच नाहीत. तर काही ठिकाणी जर लोक एकत्र एवुन समस्या घेऊन आलेच तर आपल्याच काही कार्याकर्त्यांच्या माध्यमातनू सदर च्या सभेमध्ये काहीतरी गोंधळ निर्माण करून सदर सभा तहकूब करण्यास भाग पाडायचे. असच काहीस महाड तालुक्यातील राजेवाडी ग्रामपंचायत मध्ये दिसनू आला दि.२८ जुलै २०२२ रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.मात्र सदरची सभा कोरम पूर्ण नसल्याचे कारण सांगनू तहकूब करून हि सभा दि ४ ऑगस्ट २०२२ रोजी घेण्यात येईल असे तोंडी सांगण्यात आले.

सरपंच आणि कमितीचा भोंगळ कारभार पाहता, गावातील ग्रामस्त तसेच तरुण मंडळी सदर ग्रामसभेसाठी उपस्थित राहाण्या करीता तसेच मात्र सत्ताधार्यांचा नेहमीचा डाव ओळखनू तरुणांनी ग्रामसभेमध्ये काही वादंग होऊन. आपल्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने महाड पोलीस ठाण्याशी पत्रव्यवहार करून दि ०४/०८/२०२२ रोजी च्या ग्रामसभेच्या वेळी पोलीस संरक्षण मागविले. व त्या प्रमाणे पोलिस संरक्षण हि मिळाले. 

०४/०८/२०२२ रोजी ग्रामसभा साठी राजेवाडी गावातील नागरीक व पोलीस कर्मचारी ही उपस्थित होते मात्र ग्रामपंचायतीने   डोंडी फिरवली नसल्याचे कारण देता ग्रामसभा तहकूब केली तसेच ८/०८/२०२२ रोजी ग्रामसभा घेण्यात येणार असल्याचे सांगितले आणि या अनुशंगाने ग्रामस्थ तसेच तरुण मंडळी यांनी तर पुन्हां एकदा ०८/०८/२०२२ रोजी पोलीस संरक्षण मागवले असता. पोलीस ठाण्याकडून प्रतत्तुर म्हणनू जर का सदर ग्रामसभेमध्ये जर काही गाद्दरोळ झालाच तर आपणास शांततेचा भांग केल्याप्रकरणी तूमच्यावर कारवाई केली जाईल असे कळविले. यामुळे प्रश्न असा निर्माण होतो, कि समाजात आता न्याय मागायचा कोणाकडे कारण आमच्या जीवाला धोका आहे म्हणनू संरक्षण मागितले तर आमच्यावरच कारवाई करण्याचे आम्हाला पत्र पोलीस ठाण्यमार्फत मिळाले.

त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की,पोलिस खातं खरचं आपल्या ब्रीदवाक्य 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या प्रमाणे काम करत आहे का? की कुणाच्या तरी सांगण्यावरून सर्व सामान्य लोकांना संरक्षण देण्याऐवजी त्रास देण्याचं काम करत आहे?

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "महाड राजेवाडी येथे सरपंच आणि ग्रामपंचायत कमिटी ची दादागिरी !"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...