
लाडक्या बहीण योजनेबाबत संजय राऊत यांचा दावा काय? राऊत म्हणाले, आता नवा वाद…
महाराष्ट्र : या राज्याची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर आहे, कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी कितीही मोठ्या वल्गना केल्या, आव आणला तरी हे राज्य चालवणं हे आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही. हे राज्य आर्थिक अराजकाच्या खाईत सापडलं आहे.
ते निलंबित अधिकारी आहेत, त्यांचं असंही स्टेटमेंट
आहे की मला एन्काऊंटर करण्याच्या सूचना होत्या. म्हणजे फेक एन्काऊंटर्स देशात, महाराष्ट्रात अलीकडच्या काळात घडली आहेत. त्याला पुष्टी देणारं
हे विधान आहे. त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. जर हे निलंबित अधिकारी सांगत असतील
की मी अमुक पोलिस स्टेशनच्या डायरीत अशा प्रकारची नोंद केलेली आहे तर ते अधिक
गंभीर आहे. अशी नोंद पोलीस डायरीत केलेली असेल तर त्यावरती तेव्हाच ॲक्शन का घेतली नाही असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. वाल्मिक कराड असेल किंवा धनजंय मुंडे, यातील वाल्मिक कराडचं काम संपल्यावर त्याला मारायचं असा प्लान
दिसतोय मला. नेमकं त्यामागे कोण होतं हे लोकांसमोर यायला पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केली.
8 लाख लाडक्या बहिणींना आता 1500 ऐवजी फक्त 500 रुपयेच देण्यात येणार आहेत. लाडकी बहीण
योजनेतील अटीनुसार एका सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दुसऱ्या सरकारी
योजनेचा लाभ घेता येत नाही. यामुळे आता नवा वाद निर्माण होऊ शकतो. त्यावरही संजय
राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावर आता लाडक्या बहिणींनीच प्रश्न विचारले
पाहिजेत. ज्या लाडक्या बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली, त्या मतांची किंमत आता 500 वर आली आहे, उद्या ती शून्य होईल. या राज्याची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर आहे, कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी
कितीही मोठ्या वल्गना केल्या, आव आणला तरी हे राज्य चालवणं हे
आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही. त्याचं कारण म्हणजे, गेल्या सा़डेतीन वर्षांमध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपण
बिघडलेली आहे, आर्थिक अराजकाच्या खाईत हे राज्य सापडलं आहे. मि. अजित पवार हे जरी
बोलत नसले तरी त्यांनाही त्या चिंतेंन ग्रासलेलं आहे, अमित शहांकडे एकनाथ शिंदे यांनी तक्रार केली, की अजित पवार आमच्या फाईली मंजूर करत नाहीत, आम्हाला निधि देत नाहीत. आम्हाला निधि देत नाहीत म्हणजे कोणाला? , हा प्रश्न आमच्या सारख्या लोकांना पडतो , तुमचे जे 5-25 आमदार आहेत, गद्दार आहेत ते फक्त निधि आणि पैशांच्या ताकदीवर तुमच्यासोबत राहिले
आहेत, या राज्याची तिजोरी लुटण्याची परवानगी त्यांना हवी आहे का ? असा खोचक सवाल राऊत यांनी विचारला.
0 Response to "लाडक्या बहीण योजनेबाबत संजय राऊत यांचा दावा काय? राऊत म्हणाले, आता नवा वाद…"
टिप्पणी पोस्ट करा