मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

संजय राऊत चार दिवस का गायब? स्वत:च सांगितलं कारण...

संजय राऊत चार दिवस का गायब? स्वत:च सांगितलं कारण...


महाराष्ट्र : 
ही घटना घडल्यानंतर गेल्या चार ते पाच दिवस शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे गायब झाले होते. आता आज त्यांनी पत्रकार परिषद घेत यामागील कारण सांगितले.

जम्मू काश्मीरमधील पहलगामध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला एक आठवडा उलटला आहे. या घटनेनंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनी आम्ही देशासोबत ही भूमिका घेतली आहे. मात्र ही घटना घडल्यानंतर गेल्या चार ते पाच दिवस शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे गायब झाले होते. आता आज त्यांनी पत्रकार परिषद घेत यामागील कारण सांगितले.

संजय राऊत यांनी चार ते पाच दिवसांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी त्यांनी गैरहजेरीचे कारण सांगितले.

याला बदला म्हणतात का?

मी गेले ४ ते ५ दिवस नव्हतो. राज्यात शांतता नांदावी असं मला वाटत होतं, असे संजय राऊतांनी म्हटलं. पहलगाम हल्ल्यात राजकारण आणू नये. राजकारण कोण करतंय, भाजपच्या अनेक संस्था संघटना समाजमाध्यमांवर याचं राजकारण करत आहेत. हा हल्ला झाल्यावर २४ तासांच्या आत पाकिस्तानला धडा शिकवायला हवा होता. जगभरात याच पद्धतीने बदला घेतला जातो. एक सैनिक किंवा नागरिक मारला गेला तर अमेरिका, इस्त्रायल आणि रशियासारखी राष्ट्र जी स्वत:ला बलवान समजतात किंवा ५६ इंचाची छाती वाले समजतात. ते ताबडतोब प्रत्युत्तर देतात. आम्ही पाणी बंद केलं, पण पाणी असं बंद होत नाही. त्यासाठी मोठमोठे बंधारे, धरणं बांधावी लागतील, २० वर्षांनी जेव्हा ती धरणं उभी राहतील, तेव्हा ते पाणी बंद होईल. आम्ही पाकिस्तान २७ युट्यूब चॅनल बंद केली, याला बदला म्हणतात का?” असा सवाल संजय राऊतांनी केला.

याला राजकीय इच्छाशक्ती असे म्हणतात

त्यासोबतच 4PM नावाचे एक युट्यूब चॅनल बंद केलं. कारण हे चॅनल मोदी-शाहांच्या धोरणावर टीका करते. गेले ७ दिवस मोदींचे विविध फोटो आम्ही पाहतोय. ते सैन्य अधिकारी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, सरंक्षण मंत्री यांच्यासोबत ते बैठक घेतात, त्याबद्दल चर्चा करतात. त्याला राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. १९७१ मध्ये जेव्हा भारताने पाकिस्तानावर हल्ला करण्याचे ठरवले, तेव्हा इंदिरा गांधी यांनी जनरल मानेक शॉ यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की पाकिस्तानच्या कुरापती थांबत नाहीत. त्यांच्याशी युद्ध करायचं तुमची काय तयारी आहे. तुम्ही तयार आहात का, जनरल मानेक शॉ म्हणाले आम्हाला ८ दिवस द्या. यानंतर ८ दिवसांनी पाकिस्तानवर हल्ला झाला. त्यांचे दोन तुकडे झाले आणि बदला घेतला याला राजकीय इच्छाशक्ती असे म्हणतात”, असे संजय राऊत म्हणाले.

 

0 Response to "संजय राऊत चार दिवस का गायब? स्वत:च सांगितलं कारण... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...