
सागरी इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात महत्त्वाच्या घोषणा, महाराष्ट्रात कुठे उभी राहणार इनोव्हेशन सिटी?
महाराष्ट्र : अजित पवार यांनी आज महाराष्ट्र विधानसभेत 2025-26 वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. अजित पवारांनी यावेळी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्या बद्दल जाणून घ्या.
महाराष्ट्र विधानसभेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. राज्याचे
अर्थमंत्री या नात्याने अजित पवार हे विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडत आहेत.
राज्य सरकारकडून महाराष्ट्राला प्रगती पथावर घेऊन जाण्यासाठी काय-काय घोषणा केल्या
जातात, त्याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. अजित पवारांनी अर्थ संकल्प
वाचन करताना आतापर्यंत काय-काय घोषणा केल्या आहेत? त्यावर एक नजर.
महत्त्वाच्या घोषणा
नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध
करुन देण्यासाठी तसेच नव-उपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावे, यासाठी नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर, इनोव्हेशन सिटी, उभारण्यात येणार आहे.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट
कंपनीमार्फत 10 हजार महिलांना कौशल्य व कृत्रिम बुध्दिमत्ता या विषयाचे प्रशिक्षण
देण्यात येत आहे.
पायाभूत सुविधांमध्ये एक रुपयाची
गुंतवणूक केली, तर स्थूल राज्य उत्पन्नात 2.5 ते 3.5 रुपयांची वाढ होते, हे लक्षात घेऊन विमान चालन, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जल वाहतूक, बंदर विकास, सिंचन, ऊर्जा, परिवहन व दळणवळण क्षेत्रात येत्या पाच
वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा शासनाचा निर्धार आहे.
जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण आणि
महाराष्ट्र सागरी मंडळ हे संयुक्तरित्या पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित करित
आहेत. या प्रकल्पाचा एकूण खर्च 76 हजार 220 कोटी रुपये असून त्यात राज्य शासनाचा
सहभाग 26 टक्के आहे. वाढवण बंदरामुळे सुमारे 300 दशलक्ष मेट्रीक टन वार्षिक मालहाताळणी
क्षमता निर्माण होणार आहे. जवाहरलाल नेहरु बंदराच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा ती
तिप्पट असणार आहे. सन 2030 पर्यंत नव्या बंदरातून मालवाहतूक सुरु
होणे अपेक्षित आहे. या बंदराचा समावेश कंटेनर हाताळणी करणाऱ्या जगातील पहिल्या 10 बंदरांमध्ये होणार असल्याने महाराष्ट्र राज्य भविष्यात सागरी
दळणवळणातील महाशक्ती म्हणून उदयास येईल.
पालघर जिल्ह्यात मौजे मुरबे येथे बंदर
निर्मितीच्या 4 हजार 259 कोटी रुपये किंमतीच्या प्रकल्पाला खाजगी
क्षेत्राच्या सहभागाने मंजूरी देण्यात आली आहे.
गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथून मांडवा, एलिफंटापर्यंत सुरक्षित प्रवासाकरिता
अत्याधुनिक सुविधायुक्त बोटींसाठी आर्थिक प्रोत्साहन देण्याचे धोरण जाहीर करण्यात
येणार आहे.
मुंबईत गेट वे ऑफ इंडियालगत रेडिओ क्लब
येथे प्रवासी वाहतुकीकरिता सुसज्ज जेट्टीचे 229 कोटी 27 लाख रुपये किंमतीचे काम सुरु आहे. दिघी-
जिल्हा रायगड, वेंगुर्ला- जिल्हा सिंधुदुर्ग तसेच काल्हेर डोंबिवली, कोलशेत, मिरा-भाईंदर- जिल्हा ठाणे येथील
जेट्टींची कामे प्रगतीपथावर आहेत. काशिद- जिल्हा रायगड येथील तरंगत्या जेट्टीचे
काम लवकरच सुरु करण्यात येत आहे.
0 Response to "सागरी इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात महत्त्वाच्या घोषणा, महाराष्ट्रात कुठे उभी राहणार इनोव्हेशन सिटी?"
टिप्पणी पोस्ट करा