
बाळासाहेबांच्या जयंतीदिनी ठाकरे गटाची नरेंद्र मोदी-अमित शाहंकडे सर्वात मोठी मागणी...
महाराष्ट्र : "महाराष्ट्रात कोणतीही सत्ता नसताना मराठी माणसासाठी संघर्ष केला, लढा दिला. शिवसेनेसारखी कवच कुंडलं निर्माण केली. अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी ती तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा अजिबात अधिकार नाही. बाळासाहेबांना ढोंग आवडत नव्हतं. य़ा देशात हिंदुत्वाच्या नावाखाली जे ढोंग सुरु आहे, त्याचा प्रतिकुल परिस्थितीत उद्धव ठाकेरंच्या नेतृत्वाखाली शिवसेना सामना करतेय, हा बाळासाहेबांचा विचार आहे" असं संजय राऊत म्हणाले.
“छत्रपती शिवाजी महाराजांनंतर
महाराष्ट्राला स्वाभिमानाची, लढण्याची प्रेरणा देण्याच
काम माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. आजही पिढ्या बदलल्या
महाराष्ट्रातल्या. पण येणारी प्रत्येक मराठी पिढी ही माननीय शिवसेनाप्रमुखांच ऋण
मान्य करुन बाळासाहेबांचा विचार पुढल्या पिढीला देऊन पुढे जाते. बाळासाहेब
ठाकरेंनी महाराष्ट्राला, देशाला समाजाला बऱ्याच
गोष्टी दिल्या, ते सत्तेवर कधी आले नाहीत. म्हणजे
मुख्यमंत्री, राज्यपाल कधी झाले नाहीत. ही सगळी पद
सहकाऱ्यांना, सामान्य शिवसैनिकांना दिली.
सामान्यातल्या सामान्य माणसाला शूर-वीर करण्याच काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं” अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी दिवगंत शिवसेना प्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांच्या जयंतीदिनी गौरव केला.
“शिवसेनेचे दोन गट वेगवेगळ्या सभा वैगेर
घेतायत. ज्यांना बाळासाहेब ठाकरे माहित आहेत, जे खरोखर बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, त्यांना एक गोष्ट समजली पाहिजे, माननीय शिवसेनाप्रमुखांनी उभ्या
आयुष्यात वेगळा गट निर्माण केला नाही. त्यामुळे गट हा शब्द चुकीचा आहे. जिथे
मातोश्री आहे, तिथे शिवसेना आहे. बाजारात डुप्लीकेट औषध असतात, कपडे असतात, असा शिवसेनेच्या नावाने चायना माल
बाजारात आला असेल तर तो तात्पुरता असतो. दिवाळीत चिनी फटाके येते. वात पेटते पण
वाजत नाही. अशा गोष्टी भाजपाकडून निर्माण झाल्या आहेत. भाजपा स्वत: चिनी माला आहे.
म्हणून ते राजकारणात चिनी मालाचा पुरवठा करत असतात” असं संजय राऊत म्हणाले.
‘अस्सल शिवसेना मातोश्रीत’
“हिंदू ह्दयसम्राटांची अस्सल शिवसेना
मातोश्रीत आहे. मातोश्रीतून निर्णय होतात” असं संजय राऊत म्हणाले. नरेंद्र मोदी
आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलय. त्यावर
संजय राऊत म्हणाले की, “त्यांना बाळासाहेब ठाकरे माहित नाहीत.
प्रतिकुल परिस्थितीत काय झुंज दिली, आम्ही अमित शाहंशी सुद्धा अशा प्रतिकुल
परिस्थितीत झुंज देत आहोत. नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी बाळासाहेबांच्या
शिवसेनेसमोर जी परिस्थिती निर्माण केलीय, त्या प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत
आम्ही उभे आहोत. ती बाळासाहेबांची प्रेरणा आहे. महाराष्ट्रात येऊन मतांसाठी नाव
घेतलं म्हणून ती बाळासाहेबांची प्रेरणा ठरत नाही” अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.
सर्वात मोठी मागणी
“अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना शिवसेनेतर्फे आवाहन आहे, हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरव करा, ही शिवसेनेची मागणी आहे, तर तुम्ही खरे. हिंदू ह्द्ययसम्राट
बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार मिळायलाच पाहिजे” अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
0 Response to "बाळासाहेबांच्या जयंतीदिनी ठाकरे गटाची नरेंद्र मोदी-अमित शाहंकडे सर्वात मोठी मागणी... "
टिप्पणी पोस्ट करा