मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

रामटेक बंगला इतिहासातील या कारणांमुळे चर्चेत, चंद्रशेखर बावनकुळे बंगला बदलणार?

रामटेक बंगला इतिहासातील या कारणांमुळे चर्चेत, चंद्रशेखर बावनकुळे बंगला बदलणार?


महाराष्ट्र,मुंबई :
 मलबार हिल परिसरातील समुद्रकिनारी असणारा रामटेक बंगला मोठा, आरामदायी आणि प्रशस्त आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शासनाने हा बंगला दिला आहे. परंतु रामटेक बंगल्याची बावनकुळेंकडून अदलाबदल करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपानंतर बंगल्याचे वाटप झाले आहे. या बंगले वाटपावरुन शिवसेनेतील मंत्री नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. कारण काही मंत्र्यांना बंगल्याऐवजी फ्लॅट दिले गेले आहे. महायुती सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीनंतर सर्वात ज्येष्ठ ठरलेले मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला मिळाला आहे. परंतु रामटेक बंगल्याचा इतिहास पहिल्यास बावनकुळे बंगला बदलण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रामटेक बंगला ज्या मंत्र्यांना मिळाला, त्यांचे भवितव्य काय झाले? ही चर्चा आता सुरु झाली आहे.

समुद्रकिनारी प्रशस्त बंगला, पण

मलबार हिल परिसरातील समुद्रकिनारी असणारा रामटेक बंगला मोठा, आरामदायी आणि प्रशस्त आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शासनाने हा बंगला दिला आहे. परंतु रामटेक बंगल्याची बावनकुळेंकडून अदलाबदल करणार असल्याची चर्चा सुरु आहे. पंकजा मुंडे यांच्यासोबत बावनकुळे बंगल्याची अदलाबदल करण्याचे म्हटले जात आहे. रामटेक बंगला घेण्याची पंकजा मुंडे यांची तयारी असल्याची सुत्रांनी सांगितले. कारण या बंगल्यात गोपीनाथ मुंडे हे मंत्री असताना राहिले होते. त्यामुळे पंकजा मुंडे यांचे रामटेक बंगल्याशी भावनिक नातेही आहे.

रामटेक बंगल्याचा असा राहिला इतिहास

छगन भुजबळ : काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात भुजबळांना हा बंगला मिळाला होता. त्यावेळी तेलगी प्रकरण गाजले. स्टॅम्प पेपर घोटाळ्यात भुजबळ यांचे नाव आले. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

एकनाथ खडसे : युती सरकारच्या काळात कृषीमंत्री एकनाथ खडसे यांना रामटेक बंगला मिळाला होता. पण त्यावेळी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यामुळे त्यांना मंत्रिपद सोडावे लागले होते.

पुन्हा छगन भुजबळ : २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्या सरकारमध्ये भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय मिळाले. पण भुजबळ मंत्री असलेले मविआ सरकार अडीच वर्षात कोसळले.

दीपक केसरकर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालेले असताना केसरकर यांना मात्र मंत्रिपद गमवावे लागले. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा पत्ता कापण्यात आला.

 

0 Response to "रामटेक बंगला इतिहासातील या कारणांमुळे चर्चेत, चंद्रशेखर बावनकुळे बंगला बदलणार?"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...