
१५०० रुपये देऊन नादी लावताय काय? आता…मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना घेतलं थेट शिंगावर...
महाराष्ट्र : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणक 2024 पूर्वी धुराळा उडवून दिला. आज त्यांनी दलित-मुस्लिम, मराठा समाजाची निवडणुकीसाठी मोट बांधण्याची घोषणा केली. त्याचवेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचे नाव न घेता सरकारवर थेट हल्लाबोल केला. काय म्हणाले जरांगे पाटील?
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा
निवडणूक 2024 पूर्वची बार उडवून दिला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या
आंदोलनाचा मोठा फटका सत्ताधाऱ्यांना बसला होता. आज त्यांनी अंतरवाली सराटीत बैठक
घेतली त्यात दलित-मुस्लिम, मराठ्यांची एकत्रित मोट
बांधण्याची घोषणा केली. त्यामुळे येत्या विधानसभेत समीकरणं बदलण्याचा दावा करण्यात
येत आहे. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचे नाव न घेता राज्य सरकारवर निशाणा
साधला.
आता परिवर्तन होणार
तुम्ही शेतकऱ्यांना काय दिलं. ओबीसी, दलित, मराठ्यांना काय दिलं. ७५ वर्षापूर्वी
विजेचा पोल टाकला. तो अजूनही तसाच आहे. तोही बदलला नाही. साधी कर्जमुक्तीही केली नाही.
एक रुपयांचा पीक विमा गेला कुठे. हप्ते न भरल्याने पीक विमा देऊ शकत नाही असं
कंपन्या म्हणतात, असा आरोप त्यांनी केला.
आता 3 नोव्हेंबरला उमेदवार आणि मतदारसंघाची घोषणा
शेतकऱ्यांचं वाटोळं केलं. मराठा, धनगर आणि ओबीसींचं वाटोळं केलं. विरोधक नव्हते तरीही
त्यांनी आमच्यावर त्यांनी वार करायला नको होतं. हिन वागणूक द्यायला नको होती.
आमच्या जनतेला त्रास दिला म्हणून हा उठाव झाला. आम्ही जागांच्या लफड्यात पडणार
नाही. आम्ही लोकशाही मार्गाने जाणार आहोत. आम्ही कुणाला दादागिरी करणार नाही.
तुम्ही उभं राहतं तसं आम्ही उभं राहणार नाही. कोण उभा राहील कोण नाही हे आम्ही
ठरवणार. आचारसंहितेचे नियम पाळून काम करायचं आहे. गरीब माणूस उभा राहत असेल तर
त्याला रोखू नका. तुम्ही मतदारांपर्यंत जा. आम्ही जाणार आहोत. धमकावू नका.
३ तारखेला आम्ही उमेदवार आणि मतदारसंघ सांगणार आहोत. ४ तारखेला अर्ज मागे
घेण्यात येईल. ज्यांना अर्ज मागे घ्या सांगितलं तर त्यांनी अर्ज मागे घ्यायचा. एकच
उमेदवार राहील. बाकींच्यांनी स्टार प्रचारक म्हणून काम करायचं आहे, असं आवाहन त्यांनी केलं.
0 Response to "१५०० रुपये देऊन नादी लावताय काय? आता…मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना घेतलं थेट शिंगावर... "
टिप्पणी पोस्ट करा