
लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले का? अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं…
महाराष्ट्र,पुणे : महायुतीला सत्तेत आणण्यात लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. मात्र या विजयानंतर लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात येणार असल्याची चर्चा सर्वत होती. याबाबत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं.
महायुतीचे 230 पेक्षा अधिक उमेदवारांचा विजय झाला.
राज्यात महायुतीचं सरकार येण्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण
योजना’ गेमचेंजर ठरली. जुलै 2024 पासून सुरु करण्यात
आलेल्या या योजनेअंतर्गंत पात्र महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपये देण्यात आले. लाडक्या बहिणींनी या योजनेची मतदानरुपी
महायुतीला योग्य परतफेड करत पु्न्हा सत्तेत आणण्यात निर्णायक भूमिका बजावली.
महायुतीने दिलेल्या आश्वासनानुसार, आता लाडक्या बहिणींना
वाढीव 600 रुपये मिळणार आहेत. अर्थात आता दरमहा 2 हजार 100 रुपये मिळणार आहेत. मात्र
निकालानंतर या योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. काळजीवाहू उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी हे संभ्रम दूर केलं आहे.
अजित पवार काय म्हणाले?
“अरे काळजीवाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळ”, असं उत्तर अजित पवार यांनी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर दिलं.
दादा लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेत का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात
आला होता. अजित पवार यांनी पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची
भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधाला. यावेळेस ते बोलत होते. बाबा आढाव
पुण्यात ईव्हीएमविरोधात आंदोलन करत आहेत. या निमित्ताने अजित पवारांनी बाबा आढाव
यांची भेट घेतली.
0 Response to "लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले का? अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं…"
टिप्पणी पोस्ट करा