
मतदारयादीतून अनेक गावे वगळण्याचा भाजपचा आदेश, हिंमत असेल तर समोरुन लढा; महाविकास आघाडीचा गंभीर आरोप...
महाराष्ट्र: राज्यामध्ये महाविकास आघाडीला मतदारसंघातून सात नंबरचा फॉर्म वापरून पाच ते दहा हजार नावे कमी करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केला आहे. आज (18 ऑक्टोबर) महाविकास आघाडीने यासंदर्भात निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याचे सांगत निवडणुकीमधील हेरगिरी लज्जास्पद असल्याचे म्हटलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, अंबादास दानवे, शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगासह महायुती सरकारवर हल्लाबोल केला. मतदार यादीमधून नावे गहाळ होण्यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट हात असल्याचा गंभीर आरोप सुद्धा नाना पटोले यांनी केला. हिंमत असेल तर समोरून लढा, भाजपचा रडीचा डाव करून जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघात नाना पटोले यांनी केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी श्रीमती किरण गाडेकर (सरपंच गाव तेलाना, ता. चिखली, जि.बुलढाणा)
यांचा या संदर्भातील व्हिडिओ
पत्रकार परिषदेत सादर केला. गाडेकर यांनी मतदारयादीतून चुकीच्या पद्धतीने नावे कमी
केली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फाॅर्म 7 नंबरसह योजनादूतांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी आयोगाकडे करणार
असल्याचे म्हटले आहे.
नाना पटोले म्हणाले की, प्रत्येकाने मतदार
यादीमध्ये आपलं नाव चेक करा. हरतील म्हणून ते रडीचा डाव करत आहेत. दरम्यान, महाविकास
आघाडीकडून योजनादूत बोगस असून त्यांची नियुक्ती तत्काळ रद्द करा अशी मागणी निवडणूक
आयोगाकडे केली आहे. महाराष्ट्राची तिजोरी यांच्यापासून वाचवली पाहिजे, असे नाना पटोले
म्हणाले. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा गंभीर आरोप केला. ते
म्हणाले की फॉर्म 7 भरून
प्रत्येक मतदारसंघांमध्ये 5 हजार
नावे कमी करण्याच्या षड्यंत्र रचलं जात आहे. जिवंत माणसे मृत दाखवण्याचा प्रयत्न
केला जात आहे.
0 Response to "मतदारयादीतून अनेक गावे वगळण्याचा भाजपचा आदेश, हिंमत असेल तर समोरुन लढा; महाविकास आघाडीचा गंभीर आरोप... "
टिप्पणी पोस्ट करा