%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0.jpg)
'पवारांना रोखायचं, ठाकरेंनी गद्दारी केली त्यांना...', शाहांचं आवाहन; विदर्भातील जागांचं टार्गेटही ठरलं...
नागपूर : "आपल्यातले सर्व मतभेद दूर करा. भाजपचा चांगला कार्यकर्ता तोच ज्याला समजूत घालण्याची गरज पडत नाही," असं अमित शाहांनी आपल्या भाषणात म्हटलं.
भाजपमध्ये निवडणूक जिंकण्याचा पाया ऊर्जावान बूथ कार्यकर्ते आणि
संघटना आहे, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
यांना नागपूरमधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे
निर्देश दिले. "निवडणुका जवळ आल्या की इतर राजकीय पक्ष सभा आणि रोड-शो
करण्यास सुरुवात करतात, पण भाजप आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक
आयोजित करते. विदर्भात भाजपची मजबूत स्थिती आहे, महाराष्ट्रात भाजप सरकार स्थापन करेल," असा विश्वास अमित शाहांनी व्यक्त केला.
विदर्भ भाजपचा गड राहिला आहे. विदर्भात भाजप मजबूत राहिली तर महाराष्ट्रात भाजपा
जिंकते, असंही अमित शाह म्हणाले. तसेच पुढे
बोलताना, "भाजपचे कार्यकर्ते
वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, तर सांस्कृतिक राष्ट्रवाद प्रस्थापित व्हावा, याशिवाय भारताला सामर्थ्यवान, सुरक्षित आणि समृद्ध बनवण्यासाठी काम
करतात," असंही अमित शाह
म्हणाले. अमित शाह यांनी आपल्या भाषणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद
पवार तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.
वक्फचा
कायदा पुढील अधिवेशनात
"लोकसभा निवडणुकीनंतर
काही कार्यकर्तेंत नैराश्यात आहेत. मात्र, निराश होण्याच कारण नाही. 2024 मध्ये आपलं सरकार पुन्हा आलं आहे. भाजप जिंकली आहे. विरोधकाना
त्यांच्या स्वप्नात राहू द्या," असा टोला शाह यांनी विरोधकांना लगावला आहे. "गेल्या दहा
वर्षातील आमच काम आठवा. कोणी विचार केला होता का, राम मंदिर उभं राहील, उभं राहिलं की नाही? कोणी विचार केला होता का, कलम 370 काश्मीरमधून हटवलं जाईल. हटवलं की नाही? कोणी तिहेरी तलाक संपुष्टात येईल असा
विचार केला होता का? आम्ही सीएए आणलं, आम्ही यूसीसी आणलं. वक्फचा कायदा ही
पुढील अधिवेशनात पारित करु," असं अमित शाह
कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले.
0 Response to "'पवारांना रोखायचं, ठाकरेंनी गद्दारी केली त्यांना...', शाहांचं आवाहन; विदर्भातील जागांचं टार्गेटही ठरलं..."
टिप्पणी पोस्ट करा